Friday, 22 January 2016

शैक्षणिक ग्रुपचर्चा ३७

[1/22, 9:35 PM] Mahesh Lokhande: 🔴 ग्रुपचर्चासत्र   ३७ 🔴
🌍 चर्चेचा विषय🌍
🔶विद्यार्थ्यांच्या दहा जीवनकौशल्याच्या विकसनासाठी काय काय करता येईल?🔶
मुद्दे=१) दहा जीवनकौशल्ये
        २)जीवनकौशल्यविकसनासाठी उपक्रम

🔶चर्चेस वेळ  दि. २२/१/२०१६   रात्री ९.३० ते१०.३०पर्यंत.🔶 सर्वांनी चर्चेत सहभागी व्हावे.🔵 आपले योगदान आमच्यासाठी अनमोल आहे.🙏🙏🙏🙏🙏🙏
[1/22, 9:36 PM] Mahesh Lokhande: नेल्सन मंडेला यांनी म्हटल होतं- ‘शिक्षणच एक असे आयुध आहे ज्यातून जगात सकारात्मक बदल होऊ शकतात.’ परंतू त्यांचे हे म्हणणे केवळ शालेय शिक्षणापुरते मर्यादीत आहे? एक मूल जीवन जगण्याची कला आणि अनुभवातून मिळालेले शिक्षण कुठून शिकून येते? कोणत्याही मुलाला शिक्षणाव्यतिरिक्त इतरही कौशल्य तितकीच आवश्यक आहेत जितके शिक्षण आवश्यक आहे.
[1/22, 9:37 PM] Mahesh Lokhande: जीवन कौशल्ये

    स्व-ची जाणीव
    समानानुभूती
    समस्या निराकरण
    निर्णयक्षमता
    परिणामकारक संप्रेषण
    व्यक्ती-व्यक्तीतील सहसंबंध
    सर्जनशील विचार
    चिकित्सक विचार
    भावनांचे समायोजन
    ताणतणावांचे समायोजन

ध्येये
१.  स्वतःमधील गुणवैशिष्ट्यांमधील माहिती करून घेण्यास मदत करणे.

२.  व्यक्तीचा भावनिक, वैचारिक, सामाजिक विकास होण्यास मदत करणे.

३.  ताणतणावविरहित जीवन जगण्यास सक्षम करणे.

४.  परिसरातील घटकांशी समन्वय साधून समस्यांवर व अडचणींवर मात करता येण्यासाठी सक्षम बनविणे.

५.  मानवी जीवन सुखी व समृद्ध होण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची जाणीव निर्माण करणे.
उद्दिष्टे
विद्यार्थ्यांना –
                   १. व्यक्तीमध्ये असलेल्या आंतरिक शक्ती व गुणवैशिष्ट्यांची जाणीव होण्यास मदत करणे व त्यानुसार आवश्यक तो बदल घडवून आणण्यास प्रेरित करणे.

                  २. दैनंदिन जीवनात येणा-या अडचणींचा व समस्यांवर विचारपूर्वक निर्णय घेऊन योग्य मार्ग काढण्यास समर्थ करणे.

                  ३. परिसरातील माहिती, ज्ञान, इतरांचे विचार इ. व्यवस्थितपणे ग्रहण करून त्यानुसार स्वतःचे मत बनविण्यास, ते योग्य प्रकारे मांडण्यास आणि प्रभावी संवाद साधण्यास सक्षम करणे.

                  ४. परिस्थितीची जाणीव करून घेऊन योग्य निर्णय घेण्याची क्षमता विकसित करणे.

                  ५. इतरांबद्दल द्वेष, मत्सर, दूषित विचार न ठेवता त्यांच्याबद्दल आदर, प्रेम, समानानुभूती बाळगुन समाजासाठी हितकारक कृती करण्याची वृत्ती निर्माण होण्यास समर्थ करणे.

                 ६. इतरांबद्दल दया, प्रेम, आदर, सद्भावना बाळगून एकमेकांमधील वैयक्तिक व सामाजिक संबंध निकोप ठेवण्यास प्रवृत्त करणे.

                 ७. परिसरातील घटना, कृती प्रसंग इ. बाबत सहजतेने व विचारपूर्वक निर्णय घेण्याची व ताणतणाव विरहित आनंदी जीवन जगता येण्याची क्षमता निर्माण करणे.

                 ८. आपल्या स्वतःच्या सुखदुःखाच्या प्रसंगात सहभागी होण्यास प्रवृत्त करणे.

                 ९. परिसरात घडलेली घटना / कृती कशा प्रकारे घडते याचा सखोल माहितीच्या आधारे विचार करून त्यावर तर्क व अनुमान, निष्कर्ष काढता येण्याची क्षमता विकसित करणे.

                १०. एखादी कृती, विचार, पारंपारिक रीतीने मांडण्याऐवजी त्यात नावीन्य, सोपेपणा, आनंद निर्माण करून वेगळेपणाने मांडण्यास मदत करणे.
[1/22, 9:43 PM] Mahesh Lokhande: जीवन कौशल्य "   
                                                                                                                                             काल  जि प प्राथ शाळा केवणीदिवे शाळेत कार्यानुभव  विषया अंतर्गत उत्पादक उपक्रमातील "अन्न एक उपक्रम" या अंतर्गत  प्रात्यक्षिक घ्यायचे  होते, काय घ्यावं? कोणता उपक्रम घ्यावा या विचारात असतानाच मुलींबरोबर चर्चा चालू होती.  माझ्याकडे इयत्ता आठवीचा वर्ग असल्यामुळे मी वेगळ्या पदार्थाच्या विचारात होते .नक्की कोणता उपक्रम  घ्यावा ? अखेर शाळेतील मुलींनी माझ्यापुढील संकट दूर केले आणि आमचा उपक्रम ठरला. ....... उपक्रम  होता प्रत्यक्ष  कृती युक्त उपक्रम ...आणि  मुलींनी उपक्रम सुचवला होता.

"वेज मंचुरियन "

सुरवातीला मी देखील  गोंधळून गेले कारण मी चायनीज  डीश बनवणे हा उपक्रम कधी शाळेत घेतला नव्हता . फक्त इंडीयन डिशच घेतल्या होत्या . पण म्हणतात न मुलं फार उपक्रमशील असतात .आणि अखेर कृती साठी आवश्यक असणारे साहित्य गोळा केले .हा उपक्रम जरा अवघड वाटत होता कारण प्रत्यक्ष  स्वयंपाकाची कृती करायची होती .  मुलींनी  सुंदर पाककृती करत "वेज मंचुरियन" बनविले त्यांनी त्यांची कृती फार सुदर रीत्या पार पाडली  .

पण एक अनुभव येवून गेला....... की मुले फार उपक्रमशील असतात .आणि शालेय अभ्यासक्रमामध्ये अश्या जीवन कौशल्यावर आधारित घटकांचा समावेश असला पाहिजे.शेवटी शाळेतील सर्व मुलांनी आपण स्वतः केलेल्या पाककृतीचा मनमुराद आनंद लुटला....

ज्योती दिपक बेलवले
जि प शाळा केवणीदिवे,ठाणे

कृतिशील शिक्षक महाराष्ट्र (ATM)
[1/22, 9:45 PM] Mahesh Lokhande: जीवन कौशल्य शिक्षण ( life skills education):-
१) स्व-जागृती
२) सामानुभूती
३) समस्या निराकरण
४) निर्णय घेणे
५) प्रभावी संप्रेषण
६) चिकित्सक विचारप्रक्रिया
७) सर्जनशील विचारप्रक्रिया
८) अंतरव्यक्ती संबंध
९) भावनांचे समायोजन
१०) ताण तणावांचे समायोजन
या दहा जीवनकौशल्याच्या विकसनासाठी उपक्रम सुचवा.
[1/22, 9:46 PM] Mahesh Lokhande: मुलांमध्ये स्व जागृती (स्वची जाणीव)कशी विकसित होईल?
[1/22, 9:48 PM] रशीद तांबोळी टे. गोळेश्वर: १)वर्गातील एखादा विद्यार्थी आजारी असला तर सर्वच मुलांनी मिळून त्याला पहायला जाणे.  २)शिक्षकही आजारी असतील तर मुलांनी त्यांची चौकशी करणे.३)दिवाळी,वाढदिवस,नववर्षानिमीत्त मिञांना स्वता बनवलेले ग्रिटिंग भेट देणे...यासारखे उपक्रम मूल्यशिक्षणासाठी उपयोगी आहेत
[1/22, 9:48 PM] Mahesh Lokhande: मुले स्वतःस ओळखु शकतील स्वाभिमान जागृत होईल व आत्मविश्वास वाढेल स्वतःच्या क्षमता व मर्यादा कळतील तेव्हाच मुलामध्ये स्व जागृती झाली व स्व ची जाणीव परिपुर्ण विकसित झाली म्हणता येईल.
[1/22, 9:49 PM] खोतसर ज्ञा: सानेगुरुजीचे चरित्र वाचण्यास द्यावे
[1/22, 9:51 PM] Mahesh Lokhande: खोतसर श्यामची आईने बालमनावर खूपच छान परिणाम होतील  खूपच परिणामकारक 👍👍👍👍👍👍👍👍
[1/22, 9:51 PM] खोतसर ज्ञा: सर्वधर्मियांच्या सणसमारंभात सहभागी होणे.
[1/22, 9:54 PM] Mahesh Lokhande: विविध स्पर्धामधून व संधीमधून मुलांस अभिव्यक्त होता येईल व त्यांना त्यांच्याआतला (खेळाडू गायक वादक नर्तक गणितज्ज्ञ शास्रज्ञ शिक्षक ....)सापडेल खरी स्वतःची ओळख होईल.
[1/22, 9:54 PM] खोतसर ज्ञा: राष्ट्रीय सणांचे महत्त्व पटवून देणे. राष्ट्रीय सणांमध्ये सहभागी होणे.
[1/22, 9:56 PM] Mahesh Lokhande: समानुभूती जीवन कौशल्यविकसनासाठी काय करता येईल.
[1/22, 9:56 PM] खोतसर ज्ञा: शेतकरी शेतमजूर कष्टकरी लोकांची मुलाखती घेणे.
[1/22, 9:57 PM] रशीद तांबोळी टे. गोळेश्वर: महात्मा गांधीचा एक परीणामकारक उपक्रम ज्याची आज फारच गरज आले.....सर्वधर्मीय प्रार्थना....स्काऊटच्या प्रशिक्षणात.याचा सुंदर अनूभव घेता आला....प्रत्येक धर्माच्या एका प्रतिनिधी मुलाने त्याच्या धर्माची प्रार्थना म्हणायची...इतर सर्वच मुलांनी पाठीमागून तीच प्रार्थना म्हणायची...असे सर्वच धर्मीयांची प्रार्थना घ्यायची..
[1/22, 10:01 PM] Mahesh Lokhande: सम + अनुभूती=
[1/22, 10:02 PM] खोतसर ज्ञा: महान व्यक्तीचे सूविचार सांगणे  विविध धर्मातील निवडक वचने सांगणे.
[1/22, 10:04 PM] रशीद तांबोळी टे. गोळेश्वर: सामान्य सुचना...जसे,१)गुड माॅर्निंग २)हाउ आर यु? ३)हाउ इज युवर ग्रॅंडमदर? ४)यू आर अ गुड बाॅय ५)आय लाईक युवर ड्रेस...६)यु आर व्हेरी क्लेवर ....यांचा वापर मुलांनी व शिक्षकांनी जास्तीत जास्त करावा...वर्गात,घरात..
[1/22, 10:04 PM] Mahesh Lokhande: जीवनकौशल्यामुळेच जीवनातील आव्हानांचा सामना सक्षमपणे करता येतो.
[1/22, 10:09 PM] खोतसर ज्ञा: भूकंपग्रस्त धरणग्रस्त  अंधव्यक्ती यांच्या विषयी सहानभुती व्यक्त करणारे कार्यक्रम शाळेत साजरे कारणे
[1/22, 10:09 PM] Mahesh Lokhande: प्रत्येक मूल स्वतंत्र व्यक्तीमत्व असते त्याला स्वतंत्र भावना विचार असतात व प्रत्येकाचे स्वतंत्र अस्तित्व व स्थान असते.ते स्वतंत्र सामाजिक मानवप्राणी असल्याने स्वतंत्र ज्ञानरचना करत  असते.
[1/22, 10:12 PM] Mahesh Lokhande: समानुभूतीनुसार विद्यार्थी सर्वांशी समभावनेने वागू लागेल मोठा छोटा गरीब श्रीमंत कसलाही भेदभाव करणार नाही सर्वांशी समभावाने वागेल मी तसाच तो समजुन इतरांस समजुन घेईन दुसर्‍यास दुखवणार नाही.
[1/22, 10:16 PM] Mahesh Lokhande: समस्यानिराकरण हे जीवनकौशल्य विकसित होणेसाठी मुलास problem solvingपध्दतीने सतत आव्हान बुध्दीस चॅलेंज देत शिकणे घडायला हवे तरच जीवनातील समस्यांचा प्राधान्यक्रम ठरवुन कौशल्याने सर्व बाजुंचा विचार करुन समस्या सोडवु शकेल.
[1/22, 10:16 PM] Mahesh Lokhande: विविध कोडी
[1/22, 10:17 PM] Mahesh Lokhande: गणितखेळ
भाषिकखेळ
शब्दकोडी
[1/22, 10:22 PM] Mahesh Lokhande: निर्णय घेणे (डिसिजन मेकिंग)
झटपट विचार करुन पटकन निर्णय घेता येणे हे जीवनकौशल्य मुलांमध्ये विकसित करता येईल
कथेवर तु काय केले असते असे झाले तर तु काय करशील असे प्रश्न मुलाची निर्णयक्षमता कशी आहे.हे आपणास कळते.पटकन निर्णय व पटकन अमंलबजावणी समस्या सोडविण्यास देणे जबाबदारी दिल्याने त्याचे निर्णयकौशल्य विशिष्ट परिस्थितीत कसे आहे हे कळते.
[1/22, 10:25 PM] Mahesh Lokhande: प्रभावी संप्रेक्षण (प्रभावी सांगणे)
आपण सांगतो हे सर्वांस पटेल असे सांगणे.दुसर्‍यास समजावुन देण्याचे कौशल्य म्हणजे प्रभावी संप्रेक्षण.
[1/22, 10:29 PM] Mahesh Lokhande: चिकित्सक विचार
critical thinking प्रत्येक गोष्टीचा कार्यकारणभाव समजुन घेण्यासाठी का कसे कशामुळे असा विचार व शोधवृत्ती विकास चिकित्सक विचार विकसनाने होतो.
[1/22, 10:30 PM] Mahesh Lokhande: परिक्षणात्मक विचार कसलीही समीक्षा या चिकित्सक विचार जीवनकौशल्यात येतात.
[1/22, 10:31 PM] सुनिता लोकरे: स्वत्वाच्या जाणीवेसाठी प्रत्येक विद्यार्थ्याला विविध उपक्रमात सहभागी करुन घेणे त्याच्यात गुण क्षमताआवड यांचीजाणीव करुन देणे
[1/22, 10:31 PM] Mahesh Lokhande: सर्जनशील विचार creative thinking यामध्ये नवनिर्मितीचे विचार येतात.
[1/22, 10:35 PM] Mahesh Lokhande: आंतरव्यक्ती संबंध कौशल्य
आपआपसातील संबंध विकसन बंधुभाव मैत्रीभाव व नाती जपणे माणुसकी जपणे सर्वांशी प्रेमाने वागणे यातुन आंतरव्यक्ती संबंध विकसित होतील .
[1/22, 10:35 PM] सुनिता लोकरे: प्रभावी संप्रेषणासाठी गटचर्चा विविध विषयावर मत मांडणे मुलाखत घेणे भाषण स्पर्धा यासारखे उपक्रम घेता येतील
[1/22, 10:38 PM] Mahesh Lokhande: भावनांचे समायोजन
आपला राग लोभ यावर ताबा ठेवणे व संयमी जीवन संतुलित जीवन जगणे.वेळेवर भावनांच्या उद्रेकावर नियंत्रण मिळवणे या गोष्टी भावना समायोजनात येतात.
[1/22, 10:40 PM] सुनिता लोकरे: समानुभूतीमुळे दूरच्या व्यक्ति शी  ही संबंध प्रस्थापित करण्याची क्षमता प्राप्त होते
यासाठी वर्गाची बैठक व्यवस्था मुलगा मुली अशी एकाआड एक करावी तसेच मुलांचे गट करताना ही मुले मली असा गट करावा
[1/22, 10:42 PM] Mahesh Lokhande: ताणतणावाचे व्यवस्थापन
कितीही खडतर परिस्थिती मनाची शांतता स्थैर्य जावु न देण्यासाठी मनाला आनंदी राहण्याची कला अवगत होणे व ताण न घेणे ताण येऊ न देणे या गोष्टी मानसिक आरोग्यासाठी आहेत.व मन स्थिर असेल कसलाही स्ट्रेस नसल्यास  खर्‍या अर्थाने ताणाचे व्यवस्थापन करता आले म्हणता येईल.
[1/22, 10:44 PM] सुनिता लोकरे: विद्यार्थ्याकडून विविध उपक्रम ,प्रकल्प घेवून सर्जनशील कौशल्याचा विकास करता येईल
[1/22, 10:47 PM] Mahesh Lokhande: खोतसर ,रशीद तांबोळीसर,सुनिता लोकरेमॅडम आपले खूप खूप आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Thursday, 21 January 2016

शैक्षणिक ग्रुपचर्चा ३६

[1/21, 6:18 PM] Mahesh Lokhande: 🔴 ग्रुपचर्चासत्र   ३६ 🔴
🌍 चर्चेचा विषय🌍
🔶विद्यार्थी शारीरिक व मानसिकदृष्ट्या निरोगी व सुदृढ बनण्यासाठी काय काय करता येईल?🔶
मुद्दे=१) शारीरिक आरोग्य
        २)मानसिक आरोग्य

🔶चर्चेस वेळ  दि. २१/१/२०१६   रात्री ९.३० ते१०.३०पर्यंत.🔶 सर्वांनी चर्चेत सहभागी व्हावे.🔵 आपले योगदान आमच्यासाठी अनमोल आहे.🙏🙏🙏🙏🙏🙏
[1/21, 9:36 PM] अरविंद गोळे: Aahar changla hava,tyahipeksha velevar hava
[1/21, 9:36 PM] सुलभा लाडमॅडम: Shririk Aarogya sathi chaqgla Aahar yogya Aarogya savai Mansik Aarogyasathi mulana dilyaJanarya sikshan var bandanghlne yogya thikani prlobhamancha vapor krne Mulanchya adiadchni saqjun ghene Tyanchya adchni smjun ghene
[1/21, 9:37 PM] अरविंद गोळे: Vatavaran changle have
[1/21, 9:44 PM] समीरअॅ: मनातील भिती घालविणे.आपुलकी निर्माण करणे.
[1/21, 9:45 PM] समीरअॅ: दप्तर ओझे कमी
शारीरिक शिक्षा बंद
आनंददायी शिक्षण
[1/21, 9:47 PM] Mahesh Lokhande: अरविंद गोळेसर अगदी बरोबर पण समतोल आहार असण्यासाठी आपण पालकांस काय सांगु शकतो.
[1/21, 9:47 PM] सुलभा लाडमॅडम: Salsala yekprkare ghr CATV As vatavran Asav
[1/21, 9:48 PM] Mahesh Lokhande: लाडमॅडम कोणत्या चांगल्या सवयी चांगल्या आरोग्यासाठी लाभदायक ठरतील.
[1/21, 9:49 PM] भालदारमॅडम ज्ञा: मुल शारीरिक दृष्ट्यानिरोगी असतील तरच बौद्धीक दृष्ट्या सक्षम असतात. मुलांना सुदृढ बनविण्या साठी  शाळापातळीवर प्रयत्न होणे गरजेचे आहे. यासाठी लहानसुट्टीत मुलांना शेंगदाणे गुळ असा छोटा डबाआणायला सांगावा. पूरक पोषण आहारात खजूर,राजगिरा लाडू,शेगदाणाचिक्की,काळे बेदाणे दिले तर मुलचा HBवाढण्यास मदत होते.मुलाच्या घरची परिस्थीती प्रथम जाणून घेण्यासाठी आई या विषया पासून सूरवात करणे गरजेचे आहे. मुलाला जवळ घेऊन विचारपूस केली असता मुल शिक्षकाशी जवळीकता साधते.
[1/21, 9:50 PM] सुलभा लाडमॅडम: Velevar zone velevar uthne yogya velijevan
[1/21, 9:50 PM] भालदार गोळेश्वर: Lahanpanapasun chhotya chhotya jababdarya sopawun balkanna  mansik drushtya saksham banwane...
[1/21, 9:52 PM] अरविंद गोळे: Mahesh sir samtol ahar ha tya tya mulachya gharchya paristitivar avlumbun asto pratekachi paristiti changli aselach ashi nahi pan saleya poshan ahar samtol asu sakto
[1/21, 9:52 PM] Mahesh Lokhande: सकस आहार स्वच्छता व प्रतिबंधक लसी मुलांचे तीन महत्वाचे शरीररक्षक आहेत.
[1/21, 9:52 PM] सुलभा लाडमॅडम: Chha n pine ghrat uplbdha Basel the khane Senga Gil etc
[1/21, 9:54 PM] अरविंद गोळे: School ne ek aharache velapatrak palkanna dyave jayala shakya asel te detil paristitinusar
[1/21, 9:55 PM] सुलभा लाडमॅडम: Mulachya Aarogyasathi ghrat svchata rakhne
[1/21, 9:56 PM] Mahesh Lokhande: दररोज अंघोळ
स्वच्छ कपडे
शौचविधीनंतर जेवणाआधी नंतर खेळल्यानंतर हात स्वच्छता
शौचालयाचा वापर
पायात पादत्राणे चप्पल बुट हवीत
दातांची स्वच्छता गोळ्या चाॅकलेट खाण्यावर प्रतिबंध
नखे वेळीच कापणे
[1/21, 9:57 PM] भालदार गोळेश्वर: Pratyek rutu madhe uplabdh honari fale(chinch,bore, fanas, ananas,Peru, draksh, kalingad, papai, etc) mulanna khanyas protsahit.karave.. Barech palak ajari padel ya bhitine hi fale  mulanna khau det nahi... Tyamule mothyapani ti fale khata yet nahit.. Nisargane bharbharun dile ahe tyacha aswad gheu de...tyamule mulanche arogy changlech rahil...pratikar shakti wadhel....
[1/21, 9:58 PM] Mahesh Lokhande: तोंडात अस्वच्छ वस्तु घालु न देणे
नखे कुरतडणे सवय घालवणे
पिण्यास स्वच्छ पाणी वापरणे
[1/21, 9:59 PM] रशीद तांबोळी टे. गोळेश्वर: १)मनाने प्रसन्न असणारे विद्यार्थीच अध्ययनात मनापासून सहभागी होतात .२)यासाठी.भितीमूक्त,शिस्तप्रिय.मनोरंजक,अध्यापन फारच गरजेचे आहे..
[1/21, 10:00 PM] Mahesh Lokhande: नियमित वजन वाढणारे मूल नेहमीच सशक्त असते.मुलाचे वजन वाढत नसेल तर ते निरोगी नाही.
[1/21, 10:00 PM] सुलभा लाडमॅडम: Kahi mulana nkhe kurtdnyachi Savoy aste ti due karnyacha prayatn krne
[1/21, 10:00 PM] खोतसर ज्ञा: मुलांची आरोग्य तपासणी आठड्यातून करणे उदाहरण दात नखे गणवेश शारीरीक स्वच्छता इ पाहाणी करणे. दररोज हात स्वछ करणे. यागोष्टीतून आरोग्य तसेच मानसिक दृष्ट्या त्याला कमी पणा येईल असे बोलणे नसावे.
[1/21, 10:01 PM] उदय भंडारे: मानसिक आरोग्यासाठी रोज विपश्यना १० मिनिट तरी करावी.
[1/21, 10:02 PM] खोतसर ज्ञा: आनंददायी रहाणेसाठी योग शिक्षण घेणे.
[1/21, 10:02 PM] पळसेसाहेब: विद्यार्थ्यांच्या शारीरिक आरोग्य विकासासाठी सकस व दर्जेदार आहाराबरोबरच नियमित विविध प्रकारचे शारीरिक खेळ, हालचाली, कसरती व व्यायाम प्रकार घेणे गरजेचे आहे.
तसेच मानसिक आरोग्यासाठी योगासने, प्राणायाम, आनापान या सारख्या उपक्रमाबरोबर सकारात्मक विचार करणेची सवय लावणे तितकेच आवश्यक आहे.
[1/21, 10:02 PM] Mahesh Lokhande: मूल सशक्त आहे व त्याची योग्य वाढ होत आहे कसे समजावे?
दर महिन्याला त्याचा दंडाचा घेर मोजावा.
वजन वयोगटानुसार वाढत आहे का पहाणे
[1/21, 10:03 PM] देसाई गो. गोळेश्वर: काही  मुलांचे  पालक  व्यसनाधीन  असतात  अशापालकांचे  प्रबोधन  अशामुलांना  मानसीक  आधार  देणे
[1/21, 10:04 PM] रशीद तांबोळी टे. गोळेश्वर: शारीरिक स्वास्थ्यासाठी नियमित व्यायाम मुले करतीलच असे नाही...यासाठी सर्व स्नायू बळकट होतील...असे खेळ शाळेतच दररोज घेता येतील..
[1/21, 10:05 PM] भालदार गोळेश्वर: Maidani khel gheun sangh ,ekjut, sahkary bhawna wadhis lagte... Roj maidani khel ghyave...sharirik v mansik arogyasathi....
[1/21, 10:07 PM] Mahesh Lokhande: शाळेच्या डब्यात पोळी भाकरी भाजी लाडू गूळ तूप पालेभाजीयुक्त थालीपीठ
नाचणी+दूध+गूळ याची वडी
उकडलेले अंडे पाव
कडधान्याची उसळ
डाळ शेंगदाणाचिक्की
असे पदार्थ हवेत.
[1/21, 10:08 PM] भालदार गोळेश्वर: Kodi, humaan,(evdhas kart-ghar kas rakht ...... shabdik khel gheun vicharas chlna dene...
[1/21, 10:09 PM] थोरात ond: बहुतेक मुलांच्या डब्यात बिस्किटे, कुरकुरे आढळतात यासाठी पालकांचे उद्बोधन करणे आवश्यक आहे.
[1/21, 10:10 PM] Mahesh Lokhande: कृश अंगकाठी, वजन कमी ,पोटाचा नगारा,हातापायाच्या काड्या, उदास खिन्न चेहरा वजन घट चामडीवर काळे डाग फोड दिसत असल्यास कुपोषित मुले समजुन पालकप्रबोधन करणे गरजेचे ठरते.
[1/21, 10:10 PM] खोतसर ज्ञा: शालेय पोषण आहारातर भाजीपाला घालून सकस आहार देणे.
[1/21, 10:12 PM] देसाई गो. गोळेश्वर: काही  मुले  शाळेत  येताना  खोड्या  काढतात  अशा  मुलांना  मार खावा  लागतो  काही  पालक आई  वडिल  मोठे  भाऊ  बहीण   वर्गातील  मुले  एखाद्याचा  दुबळेपणा  पाहून  मारतात  पालकपण  मारतआणून  शाळेत  सोडतात  अशाबाबींना  प्रतिबंध  करणे  महत्वाचे आहे
[1/21, 10:12 PM] Mahesh Lokhande: निरोगी नसणारी अशक्त मुले
वारंवार आजारी पडतात ताप सारखी सर्दी जंत विविध आजार दिसतात.
[1/21, 10:13 PM] भालदार गोळेश्वर: .mulanni khauchya paishatun khare.shengdane,chikki, futane chane..etc ghenyas sangave. ... Kurkure sarkhe padarth plastikcha wapar kela jato...ekda tyala jalun bagha ,tyacha plastic jalalyacha vas yeto... He dakhwa mulanna...
[1/21, 10:14 PM] थोरात ond: फलाहार हा कुपोषणावरील बेस्ट उपाय
[1/21, 10:17 PM] भालदार गोळेश्वर: Ghar kamat mulanni aai la wadilanna madat karavi...
[1/21, 10:18 PM] थोरात ond: प्रत्येक ऋतूत उपलब्ध असणारी फळे मुलांच्या आहातच येणे गरजेचे आहे.
[1/21, 10:18 PM] Mahesh Lokhande: मुलांचे खाण्यातील लोहाचे प्रमाण वाढवल्यास अॅनिमिआ बरा होईल.आहारात पालेभाज्या पावटे डाळी खारीक खजूर गूळ शेंगदाणे मटणपाव अंडी असे लोह असणारे पदार्थ द्यायला हवेत.
[1/21, 10:18 PM] खोतसर ज्ञा: बेकरीचे पदार्थ न खाण्याचा सल्ला देणे.
[1/21, 10:19 PM] थोरात ond: फायबर युक्त पदार्थ.
[1/21, 10:21 PM] देसाई गो. गोळेश्वर: बहुतांश  मुले  शेतकरी  कुटुंबातील  असतात  चहा  ऐवजी   दररोज  दुध  आणी  तेही   साखर  न  घालता  पिणेस  सांगावे
[1/21, 10:22 PM] Mahesh Lokhande: वजन न वाढणे वाढ न होणे चालणे बोलणे विचारशक्ती मंदावणे केस गळणे उदास निरुत्साहीवृत्ती सुज चामडीवर डाग हे सगळे कुपोषणाचे परिणाम आहेत.
[1/21, 10:22 PM] खोतसर ज्ञा: पालकानी मोड आलेल्या कडधान्ये  यांची उसळ खाण्यास द्यावी.
[1/21, 10:23 PM] Mahesh Lokhande: सकस आहार व स्वच्छता चांगल्या तब्येतीसाठी आवश्यक आहेत.
[1/21, 10:24 PM] भालदार गोळेश्वर: Pack food,Maggi sarkhe padarth maidyapasun banlele astat.... Te arogyas changle nahi... Cold drink chya aivaji limbu pani,sarbat, naralache pani, usacha ras. Ghyava....arogyas ghatak asnarya, khotya jahirati pahun bhulu naye..
[1/21, 10:26 PM] लीना वैद्यमॅडम: सगळ्यांशी मिळून मिसळून  वागणे  प्रसंगी दुसऱ्यांना मान देणे त्याचबरोबर समजूतदारपणा येण्यासाठी  योग्य  वेळी मार्गदर्शन  ही होणे आवश्यक  आहे नाहीतर असे नसल्यास मोठेपणी मूलांच वर्तन  दुसऱ्यांना अन् त्यास स्वतः स त्रासदायकच ठरु शकत... 🙏🏼
[1/21, 10:27 PM] Mahesh Lokhande: मुलांची तब्येत सुधारावी म्हणुन आपल्याकडे पुरेसे पैसे नसले तरीही सरबते बाटलीतील पेये बाहेरचे कुरकुरेसारखे प्लास्टिक पिशव्यांतील पदार्थ गोळ्या चाॅकलेट मुलांस देत असतो त्याऐवजी दोन अंडी दिली तर मोठा लाभ होईल हे पालकांस सांगायला हवे.
[1/21, 10:29 PM] Mahesh Lokhande: कमी खर्चात सकस आहार कसा असावा सांगायला हवे शाकाहारी प्रथिने खाऊनही सुदृढ व निरोगी बनता येते.
[1/21, 10:30 PM] भालदार गोळेश्वर: Mulansobat Sahkutumbane jewan karave...gharatil chote mote nirnay ghetana mulanche mat ghene...mulanchya matancha aadar karne. Khup mahtwache...
[1/21, 10:30 PM] रशीद तांबोळी टे. गोळेश्वर: मुलांना सजा करू नये..तरीही केलीच तर त्याच्या मनातून लवकरच ती सजा पूसली जावी असा प्रयत्न व्हावा
[1/21, 10:31 PM] Mahesh Lokhande: कढईतील जेवणात लोह अंश वाढतो.साखरेपेक्षा गुळात लोह अधिक असते.करवंदे बोरे या फळांतुन क जीवनसत्व भरपुर मिळते.भाज्या कमी पाण्यात शिजवायला हव्यात.
[1/21, 10:32 PM] लीना वैद्यमॅडम: शारीरिक  वाढ जितकी आवश्यक  तशीच मानसिक वाढ म्हणजेच  विकास  आवश्यक  आहे त्यांना पराभव स्विकारायला  शिकविल पाहिजे  त्याचबरोबर त्यातून खेळाडूवृत्ती जपायला शिकवल पाहिजे  नेहमु माझच खर, मलाच हव, मीच योग्य  अस न करता त्यांना योग्य  अयोग्य  शिकवायला च हव....
[1/21, 10:33 PM] लीना वैद्यमॅडम: शारीरिक  वाढ जितकी आवश्यक  तशीच मानसिक वाढ म्हणजेच  विकास  आवश्यक  आहे त्यांना पराभव स्विकारायला  शिकविल पाहिजे  त्याचबरोबर त्यातून खेळाडूवृत्ती जपायला शिकवल पाहिजे  नेहमी माझच खर, मलाच हव, मीच योग्य  अस न करता त्यांना योग्य  अयोग्य  शिकवायला च हव....🙏🏼
[1/21, 10:34 PM] Mahesh Lokhande: मुलांना रोज उन्हात खेळण्यास लावले पाहिजे सुर्यप्रकाशाचा फायदा होतो.रोज खूप घाम येईपर्यंत खेळले पाहिजे.व्यायाम व रोज आठ तास झोप मेंदूसाठी खूप फायदेशीर ठरते रोज आठ ग्लास पाणी पिणेही गरजेचे आहे.
[1/21, 10:34 PM] रशीद तांबोळी टे. गोळेश्वर: वर्गात मूलांना विशिष्ट नावे पाडू नयेत..उदा.कच्ची मूले,अप्रगत मुले..ढ..मुले.....याचा मनावर गंभीर परीणाम होतो
[1/21, 10:35 PM] Mahesh Lokhande: मुलांना शांत समंजसपणासाठी रोज त्राटक प्राणायाम आणापान विपश्यना शवासन स्वयंसुचनातंत्र यांचा वापर व्हायला हवा.
[1/21, 10:37 PM] खोतसर ज्ञा: शेतात पिकलेल्या शाळवाचा हुरडा व हरभरे भाजून खाणे. गाजर बिट मूळा खाणेस सांगणे.
[1/21, 10:38 PM] Mahesh Lokhande: मुलांची भावनिक बुध्दिमत्ता वाढणेसाठी त्यांचे मित्र होणे गरजेचे त्यांचा भावनिक विकास खूपच महत्वाचा आहे ताणतणावाचे समायोजन व समस्यानिराकरण कौशल्ये विकसित होत असताना सर्वांना समजुन घेणारी सर्वांची काळजी घेणारी मुले तयार व्हायला हवीत.
[1/21, 10:40 PM] लीना वैद्यमॅडम: एखाद्याचा भावनिक   विकास किती झालाय हा त्याच्या वर्तनावरुन कळत ...  जर मुले रस्त्यावरील कुत्र्याला  , पक्षी, प्राणी , व्यक्ती  यांना त्रास देत असेल  अशावेळी त्यांना  योग्य  मार्गदर्शन  मिळायलाच हव... माणुसकी ,दया, किंवा  संवेदनाशीलता या तत्वाची रुजवणूक लहान वयातच होणे गरजेचे आहे.. 🙏🏼
[1/21, 10:40 PM] Mahesh Lokhande: प्राणायामाने नाडीशुध्दता ह्रदयक्षमतावाढ रक्ताभिसरण चांगले होते.सर्व पेशींना भरपुर आॅक्सीजनपुरवठा होतो.प्राणायामाने एकाग्रता वाढते.याचा सराव हवा.
[1/21, 10:41 PM] उदय भंडारे: मुलांना शाळेत रोज किमान अर्धा तास खेळु द्यावे .
[1/21, 10:42 PM] Mahesh Lokhande: बुध्दीच्या निर्मळतेसाठी विपश्यना हवी आहे मनशुध्दीची साधना त्याचे पहिले पाऊल आनापान श्वासलक्षकेंद्रिकरण व मनस्थिरता एकाग्रतावाढीसाठी लाभदायक आहे.
[1/21, 10:43 PM] लीना वैद्यमॅडम: बोधपर कथा , गोष्टी , सुविचार यातून भावनिक विकास  करण्यास मदत करतात.. 🙏🏼
[1/21, 10:43 PM] हिलेमॅडम: आठवड्यातुन एकदा आरोग्य तपासणी  वर्गातील आरोग्य  मंत्री याच्यामार्फत नखे,डोळेे,केस युनिफॉम चेक करुण त्या आठवड्यातील राजकुमारी व् राजकुमार नेमावा मुले छान राहण्याचा प्रयत्न करतात.
[1/21, 10:43 PM] Mahesh Lokhande: त्राटकामुळे डोळेशुध्दी व एकाग्रतावाढ होते.
[1/21, 10:45 PM] हिलेमॅडम: किशोरविन् मुले व् मुलांसाठी आरोग्य विषयक शिबिरांचे आयोजन आवश्यक करावे
[1/21, 10:53 PM] Mahesh Lokhande: अरविंद गोळेसर,सुलभा लाडमॅडम,समीरसर,भालदारमॅडम,भालदारसर,रशीद तांबोळीसर,खोतसर,उदय भंडारेसर,आदरणीय पळसेसाहेब,शंकर देसाईसर,थोरातसर,लीना वैद्यमॅडम,हिलेमॅडम सर्वांचे आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
[1/21, 10:53 PM] थोरात ond: मुल्यसंवर्धनासाठिचे उपक्रम नियमित राबविल्यास भावनिक विकास निश्चित साधता येईल.